अटल भूजल योजनेत सावखेडा बुद्रुक ला जिल्हास्तरीय 50 लाखाचे पहिले तर खिरोद्याला 20 लाखाचे तिसरे बक्षीस

नाशिक येथे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील  दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

बातमी शेअर करा...

अटल भूजल योजनेत सावखेडा बुद्रुक ला जिल्हास्तरीय 50 लाखाचे पहिले तर खिरोद्याला 20 लाखाचे तिसरे बक्षीस

नाशिक येथे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील  दादा भुसे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

सावदा ता. रावेर l प्रतिनिधी

अटल भूजल योजना पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयोजित भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेमध्ये (सन 2022 -23)

जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सावखेडा बुद्रुक तालुका रावेर यांना तर तृतीय पुरस्कार खिरोदा ता. रावेर यांना नाशिक येथे सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी

सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या सभागृह, महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मीत्रा) नाशिक रोड, विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ,

अटल
अटल

आय एस पी नगर नाशिक येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व पालकमंत्री नाशिक ना. दादा भुसे,

तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आयुक्त पवनित कौर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

अटल
अटल

याप्रसंगी सावखेडा बुद्रुक तालुका रावेर गावाला प्रथम पारितोषिक 50 लाख रुपये बक्षीस रक्कम देऊन गौरवण्यात आले.

तर खिरोदा ता. रावेर या गावाला तृतीय पारितोषिक 20 लाख रुपये बक्षीस देऊन गौरवण्यात आले. त्यामुळे या दोन्ही गावात खूप आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांतील 43 तालुक्यांमध्ये 1133 ग्रामपंचाती मध्ये अटल भूजल योजना राबवण्यात आल्या होत्या.

त्यात जळगाव जिल्ह्यातील यावल, रावेर, अमळनेर आणि पारोळा या चार तालुक्यात 100 ग्रामपंचायती (115 गावे) सहभागी झाले होते.

ही सर्व गावे पाण्याचा अतिउपसा झाल्याने अतिशोषित या प्रकारातील आहेत. यापैकी सावखेडा बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने सरपंच,

सदस्य, भूजल मित्र, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका व मदतनीस व जलक्रांती ग्रुप, अटल भूजल समिती च्या माध्यमातून उपक्रम हाती घेतले.

सर्वांनी लोकसहभागातून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत सावखेडा गावाच्या चारही बाजूने 28 नाला बंधारे, सिमेंट नाला बंधारे,

रिचार्ज शाफ्ट शोषखड्डे, छतावरील पाऊस पाणी संकलन, वृक्षारोपण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, नैसर्गिक मंचिंग, असे उपक्रम लोकसहभागातून राबवले गेले.

तर खिरोदा ग्रामपंचातीचा पुरस्कार स्विकारताना सरपंच मनीषा चौधरी, उप सरपंच नयना इंगळे, ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील,

पाणी पुरवठा व स्वच्छता समिती सदस्या कल्पना पाटील, भूजल मित्र किरण वाघ यांची उपस्थिती होती.

सर्व ग्रामपंचायत विद्यमान सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामविकास अधिकारी तसेच गावातील शेतकरी तरुण मित्र मंडळ, पाणी बचतीसाठी

उपाय योजना म्हणून मिलिंद इंगळे, मनोज इंगळे, योगेश चौधरी, संतोष चौधरी यांनी फळबाग लागवड करून सहकार्य केले.

स्वतःच्या शेतात तळे तयार करून वसंत चौधरी, प्रल्हाद नेहते, रमेश चौधरी या शेतकऱ्यांनी पाणी जिरवण्यास मदत केली.

व डिगंबर चौधरी यांनी शेतात मल्चिंग पेपर वापरून पाण्याची बचत केली

अशा उपक्रमामुळे गावाचे भूजल पातळी सध्या 23 मीटरवर आहे. त्यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे

वरिष्ठ भूवैज्ञानिक वर्षा जैन, आय. इ.सी. तज्ञ मेघराज देसले, जिल्हा अंमलबजावणी भागीदार संस्थेच्या प्रकल्प समन्वयक दुर्गा भड, भू वैज्ञानिक आशिष भवाने,

सहाय्यक आय सी रियाज तडवी यांचे मार्गदर्शन लाभले. भूजल मित्र गोपाळ पाटील, सरपंच युवराज कराड उपसरपंच मुमताज तडवी,

रफिक तडवी, उषा पाटील व परिसरातील पुरस्कार प्राप्त सरपंच, उपसरपंच, अटल भूजल मित्र उपस्थित होते.

हे ही वाचा👇

चुंचाळे येथील शेकडो महीला पुरुषाचा आ. सौ.सोनवणे हस्ते प्रवेश

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम