अवकाळी पावसामुळे धानोरा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा...

अवकाळी पावसामुळे धानोरा परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पालकमंत्री व आमदार सोनवणे यांनी केली थेट पाहणी

धानोरा | प्रतिनिधी –जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका धानोरा परिसराला बसला आहे. याची तात्काळ दखल घेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा कृषी अधीक्षक कुबाऀन तडवी यांच्यासह गुरुवारी (दि. ८ मे) सकाळी थेट शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी पालकमंत्री व आमदार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांची व्यथा ऐकून घेतली. वादळी वाऱ्यामुळे, गारपिटीमुळे आणि मुसळधार पावसामुळे उध्वस्त झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, असे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले.

शेतकऱ्यांना योग्य व वेळेत मदत मिळावी यासाठी पंचनामे जलद गतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. तसेच, पिकविमा कंपन्यांनी पंचनामा प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मागणी करू नये, अशी तंबीही पालकमंत्री आणि आमदार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

या पाहणी दरम्यान तहसीलदार भाऊसाहेब थोरात, कृषी अधिकारी आर.एन. पाटील, गटविकास अधिकारी अनिल विसावे तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम