पिक विम्यावरून लाच मागितल्याची तक्रार ; पालकमंत्री आणि आ. चंद्रकांत सोनवणे यांनी अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी

बातमी शेअर करा...

पिक विम्यावरून लाच मागितल्याची तक्रार ; पालकमंत्री आणि आ. चंद्रकांत सोनवणे यांनी अधिकाऱ्यांची केली कान उघाडणी

 

  जळगाव | प्रतिनिधी –धानोरा येथील काही शेतकऱ्यांनी पिकविमा मंजुरीसाठी लाच मागितल्याची तक्रार केल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांची पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी चांगलीच कानउघाडणी केली.

शेतकऱ्यांनी आमदार सोनवणे यांच्या समोर थेट तक्रार मांडली. त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देत आमदार सोनवणे यांनी ती बाब पालकमंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी बैठकीत पिकविमा अधिकाऱ्यांना जाब विचारत, “शेतकऱ्यांच्या हक्काच्या विम्यासाठी पैसे मागणं अत्यंत गंभीर आणि अमानवीय कृत्य आहे,” असा स्पष्ट इशारा दिला.

या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुबाऀन तडवी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “शेतकऱ्यांच्या श्रमाचे चीज होण्यासाठी शासनाने विमा योजना दिली आहे, त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम