हवामान विभागाकडून पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी ! 

जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

बातमी शेअर करा...

हवामान विभागाकडून पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी ! 

जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

 

जळगाव प्रतिनिधी l

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानात घट झाली असून, नागरीकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र, हवामान विभागाने येत्या दोन दिवसांसाठी (दि. १० व ११ मे) पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पावसासोबत गारपीट झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांत शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. केळी, कांदा, मका, ज्वारी आदी पिकांना फटका बसून अंदाजे १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे.

गेल्या एप्रिलमध्ये तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत गेला होता. मे हिटचा धोका निर्माण झाला असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे उष्म्यापासून दिलासा मिळाला. मात्र, आगामी दोन दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

या कालावधीत कमाल तापमान ३६ ते ३७ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून, आकाश ढगाळ राहणार आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम