
हुतात्मा एक्स्प्रेस ला कजगाव चा थांबा कायम करावा
कजगाव ता.भडगाव गेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली हुतात्मा एक्सप्रेस दि.१० पासुन सुरू होत आहे मात्र पन्नास खेड्याचे केंद्रबिंदु असलेल्या कजगाव स्टेशनला सुरू असलेला थांबा रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने कजगाव सह बावीस खेड्यातील ग्रामपंचायत च्या वतीने रेल्वे प्रशासना सह रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार उन्मेष पाटील, रेल्वे बोर्ड दिल्ली,सेंट्रल रेल्वे मॅनेजर मुंबई, डीआरएम भुसावळ यांना दि.४ रोजी हुतात्मा एक्स्प्रेस थांबा सुरू ठेवण्या बाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे कजगाव रेल्वे स्टेशन ला हुतात्मा एक्स्प्रेस ला सुरू असलेला थांबा रेल्वे प्रशासन ने बंद केल्याने रेल्वे प्रशासन विरुध्द तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असुन सदर एक्स्प्रेस चा थांबा पुर्ववत सुरू करावा अशी मागणी पन्नास खेड्यातील हजारो प्रवाशी वर्गाने केली आहे तसेच परिसरातील बावीस खेड्यातील ग्रामपंचायत ने देखील निवेदन पाठवुन थांब्याची मागणी केली आहे या साठी खासदार उन्मेष पाटील यांनी दिल्ली रेल्वे बोर्डात थांबा सुरू करण्यासाठी ठोस पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे बाबत वृत्त की कजगाव चे रेल्वे स्टेशन परीसरातील पन्नास ते साठ खेड्याचे केंद्रबिंदु असल्याने भडगाव, चाळीसगाव, पाचोरा,पारोळा,कन्नड, सोयगाव या तालुक्यातील कजगाव च्या जवळपास असलेल्या पन्नास ते साठ गावातील प्रवाशांची चढउतार कजगाव च्या स्टेशन वरून असते या स्टेशनवर अगोदर भुसावळ-मुंबई, भुसावळ-देवळाली व हुतात्मा एक्स्प्रेस या तीन गाड्याना थांबा होता दरम्यान अडीच वर्षा पुर्वी कोरोना मुळे या गाड्या बंद करण्यात आल्या दरम्यान एक भुसावळ-इगतपुरी मेमुट्रेन सुरू करण्यात आली मात्र ती सुरू केल्याने एकाच बाजुची म्हणजेच नाशिक जाण्याची सोय ग्रामीण भागातील प्रवाशांची झाली मात्र सकाळी जळगाव जाण्यासाठी कोणतीही रेल्वे सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे सुरू होणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस ला दोघ बाजुने थांबा देण्याची मागणी होत आहे गेल्या अडीच वर्षा पासुन बंद असलेला हुतात्मा एक्सप्रेस दि.१० पासुन सुरू होत असलेल्या या एक्स्प्रेस ला अगोदर प्रमाणे थांबा देण्यात यावा अशी मागणी पन्नास ते साठ खेड्यातील हजारो प्रवाशांनी केली आहे ग्रामीण भागातील प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने हुतात्मा एक्सप्रेस ला कजगाव चा थांबा अत्यंत महत्वाचा आहे कारण ग्रामीण भागातील असंख्य मुल नोकरी व्यवसाया साठी नाशिक,मुंबई व पुणे येथे वास्तव्यास आहेत त्यांना येण्याजाण्या साठी तसेच त्यांच्या कुटुंबा साठी हुतात्मा एक्स्प्रेस सोयीस्कर तसेच खिशाला परवडणारे असल्याने या एक्स्प्रेस ला अगोदर प्रमाणे थांबा कायम करावा अशी मागणी होत आहे पॅसेंजर देखील सुरू करा अडीच वर्षांपासून बंद असलेला हुतात्मा एक्स्प्रेस दि.१० पासुन सुरू होत आहे त्या पध्दतीने मुंबई-भुसावळ व भुसावळ-देवळाली या दोघ पॅसेंजर देखील तात्काळ सुरू करून ग्रामीण भागातील प्रवाशांची प्रवासाची सोय रेल्वे प्रशासनाने करावी अशी मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे दि.१० पासुन सुरू होणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेस ला थांबा देण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी थेट रेल्वे बोर्ड दिल्ली येथे ठोस पाठपुरावा करून हुतात्मा एक्स्प्रेस ला कजगाव चा थांबा कायम करावा अशी मागणी साठ खेड्यातील हजारो प्रवाशा सह बावीस ग्रामपंचायत ने निवेदन पाठवत केली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम