अकरा वर्षांत भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी : ना. गिरीष महाजन

बातमी शेअर करा...

अकरा वर्षांत भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी : ना. गिरीष महाजन

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षांत सर्वांना सोबत घेवून भारताच्या उज्वल भविष्याची पायाभरणी केली. मोदींच्या अकरा वर्षांत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला, त्यामुळे विकासाला गती मिळाली, गरीबांचा विकास केला, सरकार म्हणजे सेवा या हेतूने काम करण्यात येत असून सुशासन ही देशाची संस्कृती बनली, असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

पुढे ना. महाजन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारची ११ वर्षे सेवा, सुशासन व गरीब कल्याणला समर्पित आहेत. आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत या संकल्पाकडून सिद्धीकडे नेणारी ही ११ वर्षे असून जनकल्याणासाठी संकल्प, प्रयत्न आणि समर्पणाचा ‘सुवर्णकाळ’ मोदी सरकारमुळे सर्वांना अनुभवता येत आहे. मोदी सरकारने मागच्या ११ वर्षांत केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद सुवर्णाक्षरात केली जाईल. मोदी सरकारने महिला, युवा, शेतकरी, दलित, आदिवासी, ओबीसी घटक यांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरु केल्या आहेत. भ्रष्टाचार, घोटाळे, तुष्टीकरणाची जागा जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे. डिजिटल इंडिया, पायाभूत सुविधा, शेतकरी कल्याण, संरक्षण क्षेत्र, महिला सक्षमीकरण आणि जागतिक

स्तरावर भारताची विश्वासार्हता यासारख्या क्षेत्रात मोदी सरकारने उल्लेखनीय कामगीरी केली आहे. गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता शेतकरी या चार घटकांच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध असून सरकारने घरे, शौचालये, गॅस जोडण्या, पेयजल, वीज, दरमहा ५ किलो धान्य ८१ कोटी जनतेला आणि ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य सुविधा देशातील गरीब, गरजू लोकांना उपलब्ध करून दिल्या आहेत.

मोदी सरकारच्या निर्णयांमुळे गेल्या ११ वर्षांत जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था १० व्या स्थानावरून लवकरच चौथ्या स्थानावर पोहोचणार आहे.

कलम ३७० हटवणे, तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवणे, नवीन वक्फ सुधारणा कायदा तयार करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा (उअअ) अशी अनेक ऐतिहासिक पावले मोदी सरकारने उचलली असल्याचे ना गिरीश महाजन यांनी सांगितले

या पत्रकार परिषदेस प्रदेश संघटन मंत्री विजय चौधरी, खा. स्मिताताई वाघ, आ. सुरेश भोळे, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर व महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश चिटणीस अजय भोळे, प्रदेश युवा उपाध्यक्ष भैरवी वाघ-पलांडे, माजी जि.प. उपाध्यक्ष नंदू महाजन, प्रसिद्धी माध्यम प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम