अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात हालचाल

बातमी शेअर करा...

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात हालचाल

अर्थखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे; खर्चावर नियंत्रणासाठी नवीन निविदांवर बंदी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यानंतर पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थकारभारातही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे असलेले अर्थखाते स्वतःकडे घेतले आहे.
अर्थ विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील आर्थिक स्थितीचा आढावा घेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यानुसार राज्यातील विविध सरकारी विभागांकडून होणाऱ्या मनमानी व अनावश्यक खर्चावर आळा घालण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्य शासनाच्या सर्व विभागांना नवीन निविदा काढण्यावर तसेच खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर तात्पुरती बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वाढलेल्या आर्थिक ताणाच्या पार्श्वभूमीवरही सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. अर्थखात्याचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर खर्चाचे पुनर्मूल्यांकन करून आवश्यक त्या ठिकाणी कठोर निर्णय घेण्याची तयारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या आर्थिक धोरणात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम