अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींचा दिलासा; ३१.६४ लाख शेतकऱ्यांना मदत

बातमी शेअर करा...

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटींचा दिलासा; ३१.६४ लाख शेतकऱ्यांना मदत

मुंबई : मे महिन्यापासून राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१.६४ लाख शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते.

खरीप २०२५ मधील नुकसानीसाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हानिहाय मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय मदत (कोटी रुपयांत)

हिंगोली : ३.०४ लाख शेतकरी बाधित; २३१.१८ कोटी मदत

बीड : १.१४ लाख शेतकरी बाधित; ५६.७४ कोटी मदत

धाराशिव : २.३४ लाख शेतकरी बाधित; १८९.६१ कोटी मदत

लातूर : ३.८० लाख शेतकरी बाधित; २.३५ कोटी मदत

नाशिक : ७,१०८ शेतकरी बाधित; ३.८२ कोटी मदत

धुळे : ७२ शेतकरी बाधित; २ लाख मदत

नंदुरबार : २५ शेतकरी बाधित; १ लाख मदत

जळगाव : १७,३३२ शेतकरी बाधित; ९.८६ कोटी मदत

अहिल्यानगर : १४० शेतकरी बाधित; ६ लाख मदत

राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने तातडीने दिलासा देण्यासाठी ही मदत मंजूर केली असून, उर्वरित शेतकऱ्यांसाठीचा निधी दुसऱ्या टप्प्यात जाहीर केला जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम