अभय योजनाः जळगाव जिल्ह्यात 4635 ग्राहक थकबाकीमुक्त

1746 ग्राहकांचा मागणीप्रमाणे वीजपुरवठा पूर्ववत

बातमी शेअर करा...

अभय योजनाः जळगाव जिल्ह्यात 4635 ग्राहक थकबाकीमुक्त
1746 ग्राहकांचा मागणीप्रमाणे वीजपुरवठा पूर्ववत

जळगाव प्रतिनिधी

31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर थकबाकीदारांसाठी महावितरणची अभय योजना-2024 सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. सदर योजना 31 मार्च 2025 पर्यंत सुरु आहे. योजना काळात 10 मार्च 2025 पर्यंत जळगाव जिल्ह्यातील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील 4635 ग्राहकांनी 4 कोटी 82 लाख रुपयांचा भरणा केलेला आहे. या योजनेत 1746 ग्राहकांचा त्यांच्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.

कृषी व सार्वजनिक पुरवठा योजना वर्गवारीतील ग्राहक वगळून 31 मार्च 2024 पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असणाऱ्या सर्व लघुदाब आणि उच्चदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकबाकीमुक्त होणाऱ्या खंडित ग्राहकांना नवीन वीज जोडणीची संधी देणारी ही योजना आहे.

योजनेनुसार संपूर्ण मुद्दल भरणाऱ्या ग्राहकांना वीज बिलातील शंभर टक्के व्याज व विलंब आकार माफ असणार आहे. महावितरणच्या या अभय योजनेमध्ये 31 मार्च 2025 पर्यंतच सहभाग घेता येणार आहे. तरी अधिकाधिक कायम स्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता श्री आय.ए. मुलाणी यांनी केले आहे.

जागेची मालकी, ताबेदार किंवा खरेदीदार यांच्यात बदल झाला असला तरी थकबाकीदारांना वीजबिलाच्या थकबाकीची रक्कम भरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे थकबाकीदारांना थकबाकीमुक्त होण्यासाठी तसेच सदर जागेमध्ये नवीन वीज जोडणी घेण्यासाठी, ही योजना एक मोठी संधी आहे. थकीत ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात येत आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम