अवकाळीचा मोठा फटका; १६ हजार ६३५ शेतकरी बाधित, ९,३८१ हेक्टर पिकांचे नुकसान

बातमी शेअर करा...

अवकाळीचा मोठा फटका; १६ हजार ६३५ शेतकरी बाधित, ९,३८१ हेक्टर पिकांचे नुकसान

एरंडोल, पारोळा तालुक्यांत सर्वाधिक हानी; विविध पिके उद्ध्वस्त

जळगाव : ३० मार्च रोजी जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले असून, एकूण १६ हजार ६३५ शेतकरी बाधित झाले आहेत. सुमारे ९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके नुकसानग्रस्त झाली असून काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

एरंडोल तालुका सर्वाधिक प्रभावित

नुकसानीत एरंडोल तालुका सर्वाधिक प्रभावित ठरला असून येथे ७,२८७ शेतकऱ्यांचे ५,०२७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याखालोखाल पारोळा तालुक्यात ४,६८० शेतकऱ्यांचे १,९७५ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

तालुकानिहाय नुकसानीची आकडेवारी

जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही नुकसानाची नोंद झाली आहे. जळगाव तालुक्यात १६१ शेतकरी (१३३ हे.), यावल ७३ (१११ हे.), रावेर २३ (१० हे.), बोदवड १९८ (५७ हे.), मुक्ताईनगर ६५८ (४०४ हे.), चोपडा ३३ (१८ हे.), धरणगाव ६७५ (३६५ हे.), पाचोरा १,२५० (७७१ हे.), जामनेर ५५२ (२१७ हे.), चाळीसगाव १,३०२ (४७६ हे.) आणि भडगाव ३,२७३ शेतकरी (१,४९३ हे.) अशा प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.

पिकानिहाय मोठे नुकसान

वादळी पावसामुळे मका (३,६३३ हे.), ज्वारी (३,१३९ हे.), बाजरी (१,०६६ हे.), गहू (३४१ हे.), कांदा (२०८ हे.) आणि केळी (२०१ हे.) या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तीन दिवस पुन्हा इशारा

हवामान विभागाने पुढील २ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून, काही भागांत गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम