“अहिराणी भाषा जिवंत ठेवा” – डॉ. डिगंबर महाले

अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचा उत्साह

बातमी शेअर करा...

अहिराणी भाषा जिवंत ठेवा” – डॉ. डिगंबर महाले

अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचा उत्साह

अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेशातील अहिराणी भाषेच्या जपणुकीसाठी आणि संवर्धनासाठी आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. “काहीही करा, पण अहिराणी भाषा जिवंत ठेवा,” असे प्रेरणादायी आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. डिगंबर महाले यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह (अहिराणी सेवक साथी गुलाबराव पाटील साहित्य नगरी) येथे पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानी अहिराणी भाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल पाटील, महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी. डी. पाटील यांची उपस्थिती होती.

अहिराणीचा वारसा आणि भविष्यातील दिशा
डॉ. महाले म्हणाले, “अहिराणी ही आमच्या मातृभाषेसारखी आहे. सुखदु:खाच्या प्रत्येक क्षणी ‘माय’ हा शब्द वापरणाऱ्या या भाषेला राजपत्रित दर्जा मिळावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.” संमेलनात अहिराणीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ठराव मंजूर करण्यात आला.

संमेलनाच्या उद्घाटनासाठी कानबाई पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी जि. प. सदस्या जयश्री पाटील, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, निवृत्त तहसीलदार सुदाम महाजन, लेखक व कवी प्रभाकर शेळके, प्रा. अशोक पवार, रामेश्वर भदाणे, वाल्मिक मराठे, निलेश पाटील यांचा समावेश होता.

अहिराणी साहित्य क्षेत्रातील योगदानाचा सन्मान
अहिराणी भाषेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या साहित्यिकांना संमेलनात गौरविण्यात आले.

अहिराणी साहित्य भूषण पुरस्कार – ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील आणि लेखक संजय ईश्वरदास गायन

जीवन गौरव पुरस्कार – धुळ्याच्या सुमन देसले

विशेष सत्कार – लेखक व समीक्षक प्रा. डॉ. फुला बागुल, बोधचिन्हकार किरण बागुल, कवी प्रभाकर शेळके

अहिराणी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान – निकिता पाटील, इंदिरा नेतकर, दीपक पवार, दीपक खंडाळे, संतोष पाटील, विजय पवार, गरबड अहिरे, विश्राम बिरारी, अशोक पाटील, रवींद्र भोई, कैलास चव्हाण, ईश्वर माळी, जयराम मोरे, समाधान बेलदार आणि संदीप भोई

नवीन साहित्यकृतींचे प्रकाशन
संमेलनात अनेक नव्या पुस्तकांचे प्रकाशन झाले.

‘तिन्ही दुनिया’ – प्रभाकर शेळके

‘खान्देशातील आह्यना’ – डॉ. वाल्मिक अहिरे

‘वाघडीना शानाभो’ – ज्ञानेश्वर भामरे

‘नियोग’ (नाटक) – भगवान पाटील

‘राजर्षी शाहू महाराज’ – बापूराव ठाकरे

नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग
प्रसिद्ध अहिराणी रीलस्टार निकिता पाटील यांनी संमेलनात विशेष सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. संमेलनाचे प्रास्ताविक प्रा. भगवान पाटील यांनी केले, भूमिका प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी मांडली, तर सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे आणि शरद पाटील यांनी केले. आभार रणजित शिंदे यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम