उद्योजकांवरील हल्ल्याचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

बातमी शेअर करा...

उद्योजकांवरील हल्ल्याचा निषेध; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

युवासेनेचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन; जखमी उद्योजकाची भेट

जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरात एका उद्योजकावर रिक्षेने पाठलाग करत कार अडवून करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाली असून, या प्रकरणातील दोषींवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रेमंड चौक परिसरात ही घटना घडली. एमआयडीसीतील उद्योजक संजय रामगोपाल तापडिया हे कंपनीतून घरी परतत असताना अज्ञात रिक्षाचालकाने त्यांच्या कारचा (क्र. एम.एच. १९ ई.पी. १८१०) पाठलाग सुरू केला. संशय आल्याने त्यांनी मार्ग बदलला, मात्र रिक्षेने पुढे जाऊन त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर रिक्षेतून उतरलेल्या चार ते पाच जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत टणक वस्तूने डोक्याच्या मागील बाजूस वार केला. या हल्ल्यात तापडिया जखमी झाले असून, त्यांना तीन टाके पडले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत युवासेनेने दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. निवेदन सादर करताना युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेज कक्ष जळगाव लोकसभा प्रमुख प्रीतम शिंदे, गौरव चंदनकर, खुशाल शर्मा, आकिब शेख, कार्तिक खैरनार, ओम खचणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम