उष्णतेत वाढ; विजेची मागणी ३१ हजार मेगावॉटवर जाण्याची शक्यता

बातमी शेअर करा...

उष्णतेत वाढ; विजेची मागणी ३१ हजार मेगावॉटवर जाण्याची शक्यता

दीपनगर औष्णिक केंद्र सज्ज; १८६० मेगावॉट क्षमतेतून अखंडित पुरवठ्यासाठी प्रयत्न

भुसावळ (प्रतिनिधी): राज्यात वाढत्या उष्णतेमुळे विजेच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत असून, यंदा ही मागणी सुमारे ३१ हजार मेगावॉटपर्यंत पोहोचू शकते. या पार्श्वभूमीवर भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीज केंद्राने पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यासाठी सज्जता दाखवली आहे.

दीपनगरची क्षमता १८६० मेगावॉट
दीपनगर औष्णिक केंद्राची एकूण वीजनिर्मिती क्षमता १८६० मेगावॉट असून, येथे ५०० मेगावॉटचे दोन संच, २१० मेगावॉटचा एक संच आणि ६६० मेगावॉटचा सुपरक्रिटिकल संच कार्यरत आहेत. सध्या २१० मेगावॉट क्षमतेचा एक संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद असला तरी इतर संच पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

दिवसभरात ११४३ मेगावॉट उत्पादन
गुरुवारी (९ एप्रिल) चौथ्या संचातून २९० मेगावॉट, पाचव्या संचातून २९७ मेगावॉट आणि सहाव्या संचातून ५५६ मेगावॉट असे एकूण ११४३ मेगावॉट वीजनिर्मिती करण्यात आली. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर उत्पादनात सातत्य राखण्यावर भर दिला जात आहे.

कोळशाचा पुरेसा साठा
वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेला कोळसा केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, सध्या १ लाख मेट्रिक टनांहून अधिक कोळशाचा साठा आहे. त्यामुळे उत्पादनात अडथळा येण्याची शक्यता कमी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.विजेच्या वाढत्या मागणीचा विचार करून उत्पादनाचे नियोजन केले जात असून, नागरिकांना अखंडित वीजपुरवठा मिळावा यासाठी केंद्र प्रशासन सतत प्रयत्नशील आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम