कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या

बातमी शेअर करा...

चोपडा तालुक्यातील बोरखेडा येथील घटना

चोपडा l प्रतिनिधी l  तालुक्यातील बोरखेडा येथील विनोद पुंजू पाटील (वय ४८) या कष्टकरी शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाच्या ओझ्याला कंटाळून २७ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

विनोद पाटील हे आपल्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते. शेती हाच त्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्रोत होता. मात्र, सततची नापिकी, अनियमित पाऊस, वाढती उत्पादनखर्च आणि हमीभावाअभावी मिळणारे अल्प उत्पन्न, या साऱ्यांच्या छायेत ते दिवसेंदिवस हतबल होत गेले. या संघर्षातच त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. या आर्थिक विवंचनेने गांजलेल्या मनाने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.

विनोद पाटील यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने एक कुटुंब उघड्यावर आले आहे, आणि गावावर शोककळा पसरली आहे. ते पुंजू पाटील यांचे सुपुत्र, सुरेश पाटील यांचे पुतणे आणि सुमित पाटील यांचे वडील होत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम