कर्ज आणि नापिकीमुळे शेतकऱ्याचा गळफास

अडावद येथील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा...

कर्ज आणि नापिकीमुळे शेतकऱ्याचा गळफास
अडावद येथील धक्कादायक घटना

चोपडा,प्रतिनिधी

कर्जाच्या ओझ्याला आणि सततच्या नापिकीला कंटाळलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना तालुक्यातील अडावद गावात घडली . या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नवल ताराचंद महाजन (वय ५४) असेआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. नवल हे अडावद येथील अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांनी शेतीसाठी अडावद विविध कार्यकारी सोसायटीकडून कर्ज घेतले होते. यंदा त्यांनी मक्याचे पीक घेतले, पण अतिवृष्टीमुळे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. त्यानंतर उसनवारी करून रब्बी हंगामात कांदा लावला, पण कांद्याचे दर कोसळल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतच गेला.

कर्जाची परतफेड आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न नवल यांना सतावत होता. नवीन हंगामासाठी पैसे कुठून आणायचे, या चिंतेने त्यांना ग्रासले होते. या मानसिक दबावातूनच त्यांनी २६ मार्च रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद वाघ आणि उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम