खून प्रकरणातील फरार आरोपीची धिंड; पोलिसांनी मोडली टोळीची दहशत

बातमी शेअर करा...

खून प्रकरणातील फरार आरोपीची धिंड; पोलिसांनी मोडली टोळीची दहशत

रामानंद नगर पोलिसांची धडक कारवाई; पाळधी येथून मुख्य संशयित अटकेत

जळगाव : जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झालेल्या खून प्रकरणातील फरार मुख्य संशयिताला अखेर रामानंद नगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर आरोपींच्या टोळीची दहशत मोडण्यासाठी पोलिसांनी संशयितांची पिंप्राळा परिसरातून धिंड काढत जोरदार संदेश दिला.

प्रबुद्ध नगरातील शुभम सपकाळे याला दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता प्रशांत पाटील चौकात पाच जणांच्या टोळक्याने लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली होती. गंभीर जखमी अवस्थेत उपचार सुरू असताना मुंबई येथे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली होती; मात्र मुख्य संशयित विशाल भिका सोनवणे (कोळी) हा दोन महिन्यांपासून फरार होता.

तो परराज्यात लपून बसल्याने पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, तो धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आल्याची माहिती मिळताच रामानंद नगर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सापळा रचत शनिवारी दुपारी त्याला ताब्यात घेतले.

दहशतीला पोलिसांचा चाप
या प्रकरणातील दुसरा संशयित धीरज कोळी यालाही यापूर्वी अटक करण्यात आली होती. दोघांनी ज्या भागात दहशत निर्माण केली होती, त्याच पिंप्राळा परिसरातून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तात त्यांची धिंड काढली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून गुन्हेगारांना कठोर इशारा देण्यात आला आहे.

या कारवाईनंतर जिल्ह्यात कायद्याचे राज्य कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून अशा धडक उपाययोजना सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम