
गिरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गिरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढला; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव प्रतिनिधी : पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा प्रकल्पातील पाण्याची वाढती आवक लक्षात घेऊन आज (दि. २८ ऑक्टोबर २०२५) दुपारी ३ वाजता प्रकल्पाचा विसर्ग ७,४२८ क्युसेक्स वरून वाढवून ९,९०४ क्युसेक्स (२८०.२८ क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे.
सध्या गिरणा धरणातील वक्रद्वार क्र. १ आणि ६ प्रत्येकी ६० सेंमी, तर वक्रद्वार क्र. २, ३, ४ आणि ५ प्रत्येकी ३० सेंमी इतके उघडे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गिरणा नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढलेला असून, नदीकाठावरील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, गिरणा प्रकल्पातील पाण्याची आवक वाढल्यास किंवा घटल्यास विसर्गातही तद्नुसार बदल करण्यात येईल. त्यामुळे नदी पात्रात कोणत्याही प्रकारची वाहतूक, पशुधन चरणे किंवा अंघोळ टाळावी, असेही सूचना देण्यात आल्या आहेत.
उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांनी जारी केलेल्या निवेदनात नदीपात्रात अनावश्यक वावर टाळावा आणि सतर्कता बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम