
गुढीपाडव्याच्या दिवशी तरुणाची आत्महत्या
कुसूंबा गावात हळहळ
जळगाव (प्रतिनिधी) : गुढीपाडव्याच्या मंगलमय सणाच्या दिवशीच कुसूंबा गावात एक दुर्दैवी घटना घडली. २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.
माहितीनुसार, महेश ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. कुसूंबा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, तो एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत चटई कामगार म्हणून काम करत होता. गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी तो घरी परतला. मात्र, काही वेळाने वरच्या खोलीत जाऊन आपले जीवन संपवले.
कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने महेशला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम