चांदसर परिसरात बिबट्याचा संचार, शेतकऱ्यांमध्ये भिती

बातमी शेअर करा...

चांदसर परिसरात बिबट्याचा संचार, शेतकऱ्यांमध्ये भिती

जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांची वन विभागाकडे कारवाईची मागणी

जळगाव : धरणगाव तालुक्यातील

चांदसर परिसरात बिबट्याचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत असून, या संदर्भात वन विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. गिरणा नदीकाठी असलेल्या शेत परिसरात हरण, निलगाय, रानडुक्कर, माकडे तसेच बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्हा बँकेचे चेअरमन संजय मुरलीधर पवार यांनी वन विभागाच्या धरणगाव-एरंडोल कार्यालयाला निवेदन देत परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी

अधिक पिंजरे, सोलर कॅमेरे व सोलर लाईट बसवण्याची मागणी केली आहे. श्री. पवार यांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शेतातील एका गायीवर बिबट्याने हल्ला करून तिचा मृत्यू झाला होता. त्या घटनेचे फोटो देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते.

तसेच गेल्या काही महिन्यांत बिबट्या महिन्यातून चार ते पाच वेळा फार्महाऊस परिसरात दिसून आल्याचे सांगण्यात आले आहे. काल रात्री देखील बिबट्या श्री. पवार यांच्या बैलजोडी व गाईपासून सुमारे ५० फुटांच्या अंतरावर आढळून आला. एका झाडावर चढून तो जनावरांवर हल्ला

करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले सुदैवाने जनावरे बंदिस्त शेडमध्ये असल्याने मोठा अनर्थ टळला.

सध्या वन विभागाकडून परिसरात एक पिंजरा लावण्यात आला असला तरी बिबट्य अद्याप पकडला गेलेला नाही. या भागात अनेक शेतकऱ्यांची घरे, जनावरे तसेच शेतमजुरांची लहान मुलेही वास्तव्यास असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याला पकडण्यार्च मोहीम राबवावी व केलेल्या कारवाईच माहिती लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागण श्री. पवार यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम