
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी
५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या उदघाट्न सोहळा दिमाखात पार
जळगाव -: जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत देश आहे जगातील कोणतेही चित्रपट पाहाल तर त्यात महाभारतातील पात्र तुम्हाला दिसतील असं मत अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केल.शॉट फिल्म म्हणजे कमी वेळात मोठा संदेश देणारं माध्यम सशक्त मध्यम आहे.शॉर्ट फिल्म जनजागृतीच मोठं माध्यम देवगिरी शॉर्ट फिल्म शिक्षण देणारे देवासारखं काम करतं आहे असल्याचा गौरव उद्गार जोशी यांनी काढले. अजिंठा फिल्म सोसायटी आणि कान्ह ललित कला केद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचवा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये बोलत होते.
लोकांचं मानसिक रोगाचे निदान होण्यासाठी मनोरंजन आवश्यक आहे सद्या जेन झी तरुण स्क्रीन पाहण्याची क्षमता सहा सेकंद आहे. पण फिल्मचा कंटेन्ट चांगला असेल तर धुरंधर सारख्या साडेतीन तासांचा चित्रपट ही बघतात असं मतही अभिनेते जोशी यांनी व्यक्त केल.यावेळी जेष्ठ अभिनेते मनोज जोशी यांना ‘देवगिरी चित्रतपस्वी’ पुरस्कार देण्यात आला.
उदघाट्न सोहळ्यावेळी युवा अभिनेता आरोह वेलणकर, संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटक अभिजीत गोखले, क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोदजी बापट, के.सी. ई सोसायटीच्या संचालिका डॉ शिल्पा बेंडाळे, संजय प्रभूदेसाई, अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ जयंत शेवतेकर, सचिव विनीत जोशी, कोषाध्यक्ष डॉ . संजय हांडे, कान्ह ललित केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर, प्रसिद्ध उद्योजक प्रकाशजी चौबे, आयोजन समिती सदस्य डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, उपाध्यक्ष अमित भोळे, किरणजी सोहळे मान्यवर उपस्थित होते.सकाळच्या सत्रात देशविदेशातून आलेले 80 चित्रपट दाखवण्यात आले.
सिनेमातून समाजहित आणि देशहितासाठी संदेश जाणे आवश्यक : अभिजीत गोखले –
सकाळच्या सत्रात पहिल्या मास्टर क्लास च्या चित्रपट आणि समाज जागरण या विषयावर संस्कार भारतीचे राष्ट्रीय संगठन मंत्री अभिजीत गोखले यांनी चित्रपटातून समाज जागृत करण किती आवश्यक आहे हे सांगितले.
संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा योग्य वापर होन आवश्यक :
आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलाच आहे. त्यामुळे सर्वच विषय आपण दाखवू शकतो. समाजातील समस्या, प्रश्न उपस्थित करू शकतो. परंतु आपल्या सिनेमातून अंतिमतः समाजहित आणि देशहितसाठी काहीतरी संदेश देता येईल का हा विचार केला पाहिजे.
भारतीय सिनेमात प्रत्येक भाषेचे योगदान. कला फक्त मनोरंजनासाठी नाही तर समाज जागरणासाठी आहे ही आपल्या कडे भावना आहे. राष्ट्रीय चरित्र नायकांचे गोष्टी समाजासमोर यावी हा दादासाहेब फाळकेंचा विचार होता. तो आता पुन्हा बायोपिकच्या माध्यमातून समोर येत आहे.भारत हा कथांचा देश आहे यामुळे अनेक विधायक आणि चांगले विषय आपल्याकडे आहे ते दाखवले पाहिजेत.सिनेमात समाजाचे प्रतिबिंब असते, परंतु काहीवेळा जे समाजात नाही ते आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. आपण जे दाखवतोय ते योग्य आहे का हा प्रश्न कलाकाराने स्वतःला विचारला पाहिजे, तर अधिक समृद्ध अभिव्यक्ती आणि चित्रपट समोर येतील. कलाक्षेत्रात बहिष्काराला स्थान नाही. सिनेमाचा बहिष्कार करणे अयोग्य. असं मतही त्यांनी मांडले .अभिजित गोखले यांची प्रकट मुलाखत रत्नाकर पाटील यांनी घेतली

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम