
जळगावात गोडाऊनमधून गॅस सिलिंडर वितरणास बंदी
जळगावात गोडाऊनमधून गॅस सिलिंडर वितरणास बंदी
घरपोच देणे बंधनकारक, नियम मोडणाऱ्या एजन्सींवर कारवाई होणार ?
जळगाव जिल्ह्यातील गॅस एजन्सीधारकांसाठी जिल्हा पुरवठा विभागाने आदेश जारी केले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा आता केवळ घरपोच करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एजन्सींवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना मोरे यांनी हे आदेश पारित केले आहेत. गॅस एजन्सी किंवा गोडाऊनमधून ग्राहकांना थेट सिलिंडर देण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इंधन पुरवठ्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गोडाऊन किंवा कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असल्याने सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
तात्काळ गॅस सिलिंडरच्या मागणीमुळे , गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा केटरर्स आणि मिठाई दुकानदारांसारख्या व्यावसायिक ग्राहकांवर परिणाम झाल्याचे सांगितले जात.आहे. ग्राहकांना घरगुती आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या सिलिंडरसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे. घरपोच सिलिंडर देण्याच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून, आता गॅससाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.
प्रशासन साठेबाजीविरोधात कारवाई करत असून, वितरक पुरवठ्याचे व्यवस्थापन करत आहेत. काही विशिष्ट भागांतील रहिवाशांनी पुरवठा सुरळीत झाल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या स्थानिक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.
*****
वसई , चारकोप , अमरावती , पुणे , छत्रपती संभाजीनगर , लातूर आदी शरणामधील गॅस तुटवड्याच्या आणि चार – चार दिवस रांगेत उभे राहून गॅस मिळत नसल्याच्या दूरचित्रवाणीवरील बातम्या पाहून , ऐकून जळगावातील ग्राहक आणखीनच धास्तावले आहेत . सिलिंडर नेमके कधी मिळेल याची शाश्वती कुणीच देत नसल्याने ग्राहकांना वीज शेगडी किंवा सरपण अशा पर्यायांचा वापर करावा लागत असला तरी सरपणाचेही भाव वाढलेले आहेत . सगळ्याकग गोंधळाच्या परिस्थितीचा फायदा घेऊन काळ्याबाजारात दुप्पट किमतीत सिलिंडर विक्री करणारांचे फावले आहे .
– चित्रा चव्हाण ( वाघनगर , जळगाव )
******
*******
गॅसचा तुटवडा आणि गोंधळाच्या वातावरणामुळे लग्नसराईत जेवण बनवणारे स्वयंपाकी आणि केटरर्स सिलिंडरबाबत चक्क कानावर हात ठेवत आहेत . तुम्ही सिलिंडर कुठूनही आणून द्या , आम्ही स्वयंपाक फक्त बनवून देऊ , अशी भूमिका त्यांनी घेतल्याने लग्नाच्या धावपळीतील बेजारी आणखीनच वाढली आहे . काही लग्नघरच्या यजमानांनी तर आता जळगाव शहरालगतच्या खेड्यांमधून कुठून पुरेसे सरपण लग्नाच्या जेवणावळीसाठी मिळू शकेल का ? , याचीही चाचपणी सुरु केली आहे . सरपण मिळाले तरी त्याच्या वाहतुकीच्या खर्चाने पंगतीचा खर्च आवाक्याबाहेर जातो आहे काही ठिकाणी तर अक्षरशः लग्नाच्या पंगतींमधील ताटांची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे .
– ममता तडवी ( हरिविठ्ठलनगर , जळगाव )

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम