जळगावात पोलीस स्टेशनसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा...

जळगावात पोलीस स्टेशनसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील समता नगर येथील सुनील ममराज पवार (वय २५) या तरुणाने कौटुंबिक वादातून पोलीस स्टेशनसमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्याचा मृत्यू झाला आहे.

सुनील पवार हा आई व पत्नीसह राहत होता. एका हॉटेलमध्ये काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपासून त्याची पत्नी माहेरी राहात होती. पत्नी घरी परत यावी यासाठी सुनील हा ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी मामीसोबत रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यासाठी गेला होता. त्या वेळी मामी पोलिसांना माहिती देत असतानाच सुनीलच्या मोबाईलवर पत्नीचा फोन आला. दोघांमध्ये वाद झाला आणि संतापाच्या भरात सुनीलने वाहनातील पेट्रोलची बाटली काढून अंगावर ओतली व स्वतःला पेटवून घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी योगेश माळी यांनी शर्ट काढून त्याच्या अंगावरची आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि तात्काळ त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तो ६० ते ६५ टक्के जळाल्यामुळे गंभीर अवस्थेत होता. उपचार सुरू असतानाच अखेर रविवारी (दि. १४ सप्टेंबर) रात्री सात वाजता त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे समता नगर परिसरात शोककळा पसरली असून रामानंदनगर पोलीस स्टेशनतर्फे पुढील तपास सुरू आहे. पोलीस स्टेशनसमोरच घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम