जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अट्टल चोरटे जेरबंद

बातमी शेअर करा...

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; अट्टल चोरटे जेरबंद

गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी; चोरीचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव (प्रतिनिधी):- शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या कारवाईत तीन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. यासाठी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाची विशेष टीम तयार करण्यात आली होती.

दरम्यान, दिनांक १ एप्रिल २०२६ रोजी राजमालतीनगर, दूध फेडरेशन परिसरातील संजू बिस्मिल्ला पटेल (वय ४९) यांच्या घरातून ३२ हजार रुपये किमतीची चिलर मशीन व ३० हजार रुपये किमतीचा ५ एचपी पाण्याचा मोटारपंप चोरीला गेला होता. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. त्यानुसार नासिर निसार शेख (वय १९), कार्तिक संजय मोरे (वय २१) आणि युवराज रमेश गुरचवडे (वय १९) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड, उपनिरीक्षक अशोक खेडकर तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून, गुन्हेगारीवर अंकुश बसण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम