
जिल्ह्यातील चार चोरीच्या गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा ; संशयित अद्याप फरार
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती
जिल्ह्यातील चार चोरीच्या गुन्ह्यांचा पोलिसांनी लावला छडा ; संशयित अद्याप फरार
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पत्रकार परिषदेत माहिती
जळगाव प्रतिनिधी
जिल्हा पोलीस प्रशासनाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर, भडगाव आणि मुक्ताईनगर येथे झालेल्या चार गंभीर चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात मोठे यश मिळाले आहे. या सर्व चोरीच्या घटनांमध्ये मध्यप्रदेशातील एका टोळीचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत या तपासाची माहिती दिली. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आणि चोरीच्या घटनांबाबत तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचे सूचित केले. पोलिसांच्या या कार्यवाहीमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये विश्वास वाढला आहे, आणि चोरीच्या घटनांवर आळा बसण्याची अपेक्षा आहे.
भडगाव तालुक्यातील वाडे येथील सुनील निंबा पाटील यांच्या मुलीचे लग्न १७ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील विराम लॉन्स येथे झाले होते. या समारंभादरम्यान, अज्ञात चोरट्यांनी १० लाख ४१ हजार रुपये किमतीचे ९ प्रकारच्या दागिन्यांची पिशवी चोरून नेली होती. या प्रकरणी जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अमळनेर, मुक्ताईनगर आणि भडगाव येथे तीन चोरीच्या घटना घडल्या होत्या. या सर्व घटनांमध्ये एकाच पद्धतीचा वापर केल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक साधनांच्या आधारे तपास करून मध्यप्रदेशातील या टोळीचा शोध लावला. या तपासादरम्यान, पोलिसांनी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित चोरटे अद्याप फरार आहेत, आणि त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस कार्यरत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम