
ठोस तंत्रज्ञान शोधून प्रवाश्यांचा त्रास थांबवावा -खासदार स्मिता वाघ
अंडरपास बोगदे पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाश्याना त्रासदायक
ठोस तंत्रज्ञान शोधून प्रवाश्यांचा त्रास थांबवावा -खासदार स्मिता वाघ
अंडरपास बोगदे पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाश्याना त्रासदायक
अमळनेर : अमळनेर तालुक्यातील रेल्वेचे सर्वच अंडरपास बोगदे पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून याबाबत काही तरी ठोस तंत्रज्ञान शोधून प्रवाश्यांचा त्रास थांबवावा, अशा सूचना वजा निर्देश खासदार स्मिता वाघ यांनी जिल्हा नियंत्रणच्या बैठकीत दिले.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे होत्या. दरम्यान देशातील सर्वच अंडरपास बोगद्यांची अवस्था अशीच असल्याने सभागृहात शून्य प्रहरात हा विषय मांडणार असल्याचेही स्मिता वाघ यांनी
सांगितले. रेल्वे प्रशासनाने गेट बंद करण्यासाठी अंडरपास व ओव्हर ब्रिजचा पर्याय काढला. मात्र खर्च
वाचवण्यासाठी अंडरपास बोगद्याचा मार्ग अवलंबण्यात आला आहे. त्या ठिकाणी पाणी साचते आणि ते पाणी काढण्यासाठी काही कंत्राटी मजूर नेमण्यात आले आहेत. परंतु अधिकाऱ्यांनी या मजुरांचे पेमेंट केलेले नाही. तसेच अनेक ठिकाणी भूजल पातळीवर असल्याने सत्त अंडरपास बोगद्यात पाणी साचते.
त्यामुळे प्रवाश्यांना त्रास होतो. म्हणून देशातील सर्वच अंडरपास बोगद्याबाबत तज्ञ अभियंत्यांची नियुक्ती करून समस्या कायमची मिटवावी अशी मागणीही खासदार वाघ यांनी केली आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम