तरुणांनी उद्योजकतेकडे वळून ‘रामराज्य’ साकारावे” – डॉ. प्रवीण तोगडिया

बातमी शेअर करा...

तरुणांनी उद्योजकतेकडे वळून ‘रामराज्य’ साकारावे” – डॉ. प्रवीण तोगडिया
चाळीसगाव (प्रतिनिधी)
“राम मंदिर उभारणीनंतर आता देशाने ‘रामराज्य’ साकारण्याच्या दिशेने पुढे जायला हवे. त्यासाठी तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योजकतेकडे वळणे अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन प्रवीण तोगडिया यांनी मेहुणबारे येथील धर्मजागर सभेत केले.
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने संत तुकाराम बीज सभामंडप येथे आयोजित या सभेत ते बोलत होते.

डॉ. तोगडिया म्हणाले, “ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभारले, तर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कच्च्या मालाचे तयार उत्पादनात रूपांतर करून विक्रीची साखळी निर्माण केल्यास गावांची अर्थव्यवस्था मजबूत होईल.” त्यांनी पुढे सांगितले की, “देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संसाधनांचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी जनसंख्या नियंत्रण कायदा लागू करणेही तितकेच गरजेचे आहे.”
या वेळी १००८ महामंडलेश्वर परमेश्वरा नंदगिरी महाराज, विकास रेंगे, प्रवीण कोळी, राहुल चौधरी, अविनाश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष संदीप लांडगे, समाधान पाटील, कैलास फौजी आणि संजय गढरी यांनी केले. सभेला मेहुणबारे व परिसरातील ग्रामस्थांसह राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम