दिक्षा कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

बातमी शेअर करा...

दिक्षा कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

पाल गावातील घटनेने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ; तिघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

रावेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाल गावातील ‘दिक्षा कृषी केंद्रात’ शिरून तिघा अज्ञात चोरट्यांनी काउंटरमधील ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाल येथील रहिवासी गणेश मानसिंग पवार (वय ३३) यांचे गावात ‘दिक्षा कृषी केंद्र’ नावाचे दुकान आहे.

दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजेच्या सुमारास तीन अज्ञात इसम दुकानात आले. यावेळी त्यापैकी दोघांनी दुकानमालकाचे लक्ष वेधून घेतले, तर तिसऱ्या व्यक्तीने काउंटरमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या एक लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांचे एक बंडल शिताफीने चोरून नेले.

घटनेची माहिती समोर आल्यानंतर दि. ४ मार्च रोजी या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जगदीश पाटील हे पुढील तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम