
दुचाकी जाळल्याच्या घटनांमुळे संतप्त नागरिकांचा पोलिसांना घेराव
दुचाकी जाळल्याच्या घटनांमुळे संतप्त नागरिकांचा पोलिसांना घेराव
नशिराबाद : येथील पेठ भागात वारंवार घडणाऱ्यादुचाकी जळीत प्रकरणांमुळे संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी बुधवारी दि. ११ रोजी संध्याकाळी नशिराबाद पोलीस स्टेशनला घेराव घालत तीव्र निषेध नोंदवला. मोठ्या संख्येने पुरुष व महिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जमून या घटनांचा तात्काळ छडा लावण्याची मागणी केली.
पेठ परिसरात गेल्या काही महिन्यांत दुचाकी जाळण्याच्या सलग तीन घटना घडल्या आहेत. मात्र अद्यापपर्यंत या घटनांमध्ये कोणत्याही संशयिताला ताब्यात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “आमच्या भागात तीन दुचाकी जाळल्या गेल्या, पण आजपर्यंत तपास शून्य आहे. पोलिसांनी आपल्या
पद्धतीने कसून तपास करून संशयितांना तातडीने ताब्यात घ्यावे,” अशी मागणी आंदोलक नागरिकांनी केली. या प्रकारांमुळे रात्रीच्या वेळी परिसरातील रहिवासी प्रचंड भयभीत झाल्याचेही नागरिकांनी सांगितले.
“जे कोणी हे कृत्य करत आहेत ते सराईत व बदमाश प्रवृत्तीचे असावेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी,” अशी भूमिका अनेक नागरिकांनी व्यक्त केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम