
दुभंगलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा आवश्यक
ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांचे प्रतिपादन
दुभंगलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा आवश्यक
ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांचे प्रतिपादन
जळगाव ( प्रतिनिधी) : दुभंगलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचारांची प्रेरणा घेऊन कृतीशील होऊन मानवतावादी मूल्य रुजविण्याची गरज आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र प्रशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी श्री देवकर बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य व विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.म.सु.पगारे, व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालक प्रा.मधुलिका सोनवणे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ.अतुल बारेकर हे होते. ही कार्यशाळा भारतीय समाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, भारत सरकार यांचेकडून मंजुर झालेल्या अनुदानातुन करण्यात येत आहे.
श्री.देवकर पुढे म्हणाले की, दुसऱ्यांच्या दु:खाची जाणीव स्वत:मध्ये निर्माण व्हावी व ते दु:ख दुर करण्यासाठी सज्ज व्हावे, या स्वामी विवेकानंदाच्या विचारांची गरज आजच्या सामाजिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे. तरुणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रप्रथम हे विचार अंगिकारावे, एकात्म मानवतावादाची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी व राष्ट्र उभारणीच्या कार्यात तरूणांनी सहभागी व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप करतांना प्र-कुलगुरु प्रा. एस.टी.इंगळे यांनी सांगितले की स्वामी विवेकानंदांचे विचार जगाला दिशादर्शक आहेत. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या क्षमा, नम्रपणा, प्रखर राष्ट्रभक्ती या गुणातून मानवतेचा संदेश पोहचतो. नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होऊन भारताचा चांगला नागरीक घडण्याची क्षमता आहे. डॉ. अतुल बारेकर यांनी या चर्चासत्राचा अहवाल सादर केला. संशोधक विद्यार्थी संदीप अहिरे, कोमल ढगे, विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रा.विजय घोरपडे यांनी तर आभार प्रा.म.सु.पगारे यांनी मानले. परिचय प्रा. प्रतिभा गलवाडे यांनी करुन दिला.
आज सकाळ सत्रात वक्ते निखिल यादव यांनी स्वामी विवेकानंद यांच्या दृष्टीने युवकांचा विकास त्यांनतर वक्त्या प्रा. अपर्णा लळीकर यांनी स्वामी विवेकानंदांच्या दृ्ष्टीने महिलांचे सक्षमीकरण या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर संशोधकांनी त्यांचे शोध निबंध सादर केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम