निसर्गातील बदल सांगतो हवामानाचा अंदाज : पंजाबराव डख

बातमी शेअर करा...

निसर्गातील बदल सांगतो हवामानाचा अंदाज : पंजाबराव डख

मान्सूनपूर्व शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन; पारंपरिक ज्ञानावर भर

चाळीसगाव : बदलत्या हवामानामुळे अवकाळी पावसाचा धोका वाढत असताना, निसर्गातील सूक्ष्म बदलांवरूनच पावसाचा अचूक अंदाज लावता येतो, असे प्रतिपादन हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले. तंत्रज्ञानावर वाढता अवलंब आणि पारंपरिक ज्ञानाचा विसर यामुळे शेतकरी हवामानाचे संकेत ओळखण्यात मागे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील वाघडू येथे आयोजित मान्सूनपूर्व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मान्सूनपूर्व हवामान अंदाज, पिकांचे नियोजन आणि निसर्गचक्र याविषयी सविस्तर माहिती दिली. “कॅलेंडरमधील तिथी व तारखांनुसार हवामानाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. विशेषतः ११ जून आणि २० सप्टेंबर या तारखा पावसाच्या स्वरूपाबाबत संकेत देतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.

निसर्गातील झाडे, वनस्पती तसेच पशुपक्ष्यांच्या वर्तनातील बदलांवरूनही पावसाचा अंदाज घेता येतो. या नैसर्गिक संकेतांचा अभ्यास करून शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मेळाव्यात जलतारा प्रकल्पाचे जनक पुरुषोत्तम वायाळ यांनी पाणी साठवणुकीबाबत मार्गदर्शन करत जलताऱ्याच्या क्षमतेची उदाहरणे दिली. तसेच एसआरटी शेती तंत्रज्ञानाविषयी राहुल पाटील यांनी कमी खर्चात आणि कमी मशागतीत अधिक उत्पादन कसे घेता येईल, याचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास तलाठी सतीश शिंदे, कृषी भूषण बाळासाहेब राऊत, सहाय्यक कृषी अधिकारी शेखर पाटील, ग्रामसेवक मधुकर जाधव, विस्तार अधिकारी सतीलाल सोनवणे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम