बकरी बोकडांच्या चोरी करणाऱ्या ‘तिकडी’ला ठोकल्या बेड्या !

बातमी शेअर करा...

बकरी बोकडांच्या चोरी करणाऱ्या ‘तिकडी’ला ठोकल्या बेड्या !

रोख रकमेसह मुद्देमाल हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात बकरी व बोकड चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तिघा सराईत चोरट्यांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली बकरी, विक्रीतून मिळालेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे प्राणी चोरीच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

फिर्यादी सय्यद परवेज सय्यद आसिफ (वय २६, रा. दत्त मंदिराजवळ, शनिपेठ) यांनी ९ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, २७ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरून ७,००० रुपयांचा बोकड आणि शेजारील आवेश शेख यांच्या घरासमोरून ६,००० रुपयांची बकरी चोरली होती. या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीएनएस गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने सापळा रचला आणि संशयितांना ताब्यात घेतले.

सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. गणेश वासुदेव जाधव (वय २०, रा. चिंचोली, ता. जळगाव),गणेश अशोक पाटील (वय २१, रा. चिंचोली, ता. जळगाव) ,अक्षय विजय वंजारी (वय २३, रा. चिंचोली, ता. जळगाव)या तिघांनी शनिपेठच नव्हे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून देखील तीन बकऱ्या चोरल्याचे कबूल केले आहे.

या यशस्वी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह सहा. फौजदार अतुल वंजारी, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रतनहरी गिते, सिद्धेश्वर डापकर, प्रदीप चवरे आणि रवींद्र कापडणे यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम