भारतीय ज्ञान परंपरेला प्राचीन वारसा – आचार्य श्रेयस कुऱ्हेकर

बातमी शेअर करा...

भारतीय ज्ञान परंपरेला प्राचीन वारसा – आचार्य श्रेयस कुऱ्हेकर

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) भारतीय ज्ञान परंपरेचा जगावर प्रभाव पाडायचा असेल तर आपल्या पुरातन काळातील ज्ञानाची अधिकृतता पुराव्यानिशी सिध्द करणे, आपल्या प्राचीन ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी समुह तयार करणे व तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शनपर व्‍याख्याने प्रसारीत करणे या चार बाबींवर कार्य करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन भारतीय ज्ञान परंपरेचे अभ्यासक आचार्य श्रेयस कुऱ्हेकर यांनी दि. ४ मार्च रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे भारतीय मानव्य प्राच्यविद्या अध्ययन केंद्र व कला व मानव्यविद्या प्रशाळेच्या भारतीय ज्ञान परंपरा केंद्रातर्फे ‘भारतीय ज्ञान परंपरा आणि त्याचा जागतिक प्रभाव’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करतांना केले.

यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे, प्रशाळेचे संचालक प्रा. राम भावसार व समन्वयक प्रा.विणा महाजन हे उपस्थित होते. ही राष्ट्रीय परिषद पीएम उषा व भारत सरकारच्या भारतीय ज्ञान परंपरा कक्ष यांच्या सहकार्याने घेण्यात येत आहे. यावेळी आचार्य कुऱ्हेकर बीजभाषण करतांना बोलत होते. त्यांनी सांगितले की, भारतीय ज्ञान परंपरेला प्राचीन वारसा आहे. या ज्ञान परंपरेचा जागतिक प्रभाव १८ व्या शतकातही होता. भारतातील आयुर्वेद, योगविद्या, गड किल्ल्यांचे वास्तुशास्त्र, गणितशात्र, जलव्यवस्थापन, आहारशास्त्र आदी विविध विषयात भारताच्या जागतिक प्रभाव आहे. यावेळी त्यांनी विविध शब्दांची मांडणी करुन त्यांच्या अर्थातील स्पष्टता दर्शविली. आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेतील समृध्दता फक्त सांगायची की त्याचा जगावर प्रभाव पाडायचा हे आपल्याला ठरावावे लागेल असे सांगून त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा जगावर प्रभाव पाडण्यासाठी यातील विविध पैलूंचा, विशेषतः ज्ञान, विज्ञान-तंत्रज्ञान, नाविन्यता आणि जागतिक विचारसरणीतील भारताच्या योगदानाचा सखोल अभ्यास करणे हा आहे.

अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय ज्ञान परंपरा शाश्वत आहे. सध्या असलेले पर्यावरण, मानसिक व इतर आरोग्य, तंत्रज्ञानातीली बदल, एआय वापरातील नैतीकता यांना सामोर जाण्यासाठी भारतीय ज्ञान परंपरा उपयोगी पडेल. मात्र त्याकरीता आपल्याला भारतीय ज्ञान परंपरेतील सबळ पुराव्यानिशी अधिकृतता दाखवावी लागेल. या विषयाचा व्यापक प्रसार व प्रचार होणे आवश्यक आहे ही बाब अशा परिषदांमधून होईल असे वाटते.

प्रास्ताविक करतांना व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी भारतीय ज्ञान परंपरेची आवश्यकता विशद करुन पंतप्रधानांनी मांडलेल्या पंचप्राण बाबत माहिती दिली. आभार प्रा.वीणा महाजन यांनी मानले. विद्यार्थीनी इशिका गुप्ता व दीपाली माळी यांनी सूत्रसंचालन केले. १६० संशोधकांनी यावेळी नोंदणी केली. या उदघाटन सत्रात शिक्षण तज्ज्ञ अनिल राव, अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील, प्रा. अनील डोंगरे, प्रा. राकेश रामटेके, अधिसभा सदस्य वैशाली वराडे, प्रा. एस.आर.पाटीन, प्रा. नितीन बारी आदी शिक्षक, संशोधक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम