भुसावळ विभागातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १४ एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू

बातमी शेअर करा...

भुसावळ विभागातील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १४ एप्रिलपासून नवे वेळापत्रक लागू

दुरांतो, अमरावती, विदर्भ एक्सप्रेसच्या वेळेत सुधारणा; प्रवाशांनी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच तांत्रिक कारणास्तव भुसावळ विभागातून धावणाऱ्या निवडक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये अमरावती एक्सप्रेस, नागपूर दुरांतो आणि विदर्भ एक्सप्रेससारख्या प्रमुख गाड्यांचा समावेश असून, सुधारित वेळापत्रक १४ एप्रिल २०२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, १२२८९ सीएसएमटी-नागपूर दुरांतो एक्सप्रेस आता मुंबईहून रात्री १९.५५ ऐवजी २०.३५ वाजता सुटेल आणि भुसावळ येथे रात्री ०२.४५ वाजता पोहोचेल. १२१११ सीएसएमटी-अमरावती एक्सप्रेस नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, अकोला मार्गे सकाळी ०८.३५ वाजता अमरावती येथे पोहोचणार आहे. १२१०५ विदर्भ एक्सप्रेस बडनेरा येथे सकाळी ०५.५८ वाजता येऊन ०६.०० वाजता पुढे रवाना होईल. तर १२२९० नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्सप्रेस बडनेरा येथे रात्री २२.१० वाजता आणि भुसावळ येथे मध्यरात्री ००.५० वाजता दाखल होईल.
याशिवाय बडनेरा स्थानकावरील अनेक गाड्यांच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. अहमदाबाद-पुरी, गांधीधाम-पुरी गाड्या सकाळी ०८.०२ वाजता, हावडा मेल सकाळी ०८.१० वाजता, अजनी-पुणे साप्ताहिक एक्सप्रेस रात्री २२.३३ वाजता, तर अमृत भारत एक्सप्रेस रात्री २२.२० वाजता बडनेरा येथे पोहोचणार आहे.
दरम्यान, हे सर्व बदल १४ एप्रिलपासून विविध टप्प्यांत लागू होणार असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा ‘एनटीईएस’ प्रणालीवर अद्ययावत वेळापत्रक तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम