
भोरटेक येथे विजेच्या शॉर्टसर्किटमुळे एका शेताला आग
भोरटेक शिवारात बालू दौलत पाटील यांचे शेत गावाला लागून चाळीसगाव रस्त्यावर आहे ह्याच शेतातून विजेचे तार गेले आहेत मोठ्याने हवा आल्याने दोन्ही तारे एकमेकांवर आदळल्याने शेतात शॉर्टसर्किट झाला व यामुळे शेताला आग लागली सुदैवाने शेतकरी शेतात असल्याने मोठा अनर्थ टळला सकाळी नऊ वाजता आग लागल्याने शेतकरी व ग्रामस्थ जवळच असल्याने त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली जर येथे कोणी नसते तर मोठा अनर्थ घडला असता कारण शेताला लागूनच गावाची दाट वस्ती असल्याने मोठ्या प्रमाणावर धोक्याची शक्यता होती तर आग लागलेल्या शेताला लागून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात बाजरी मका व अन्य पिके कापून ठेवली होती व अनेक ठिकाणी गुरेढोरे ही बांधली होती मात्र ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळल्याने शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला
“””:वीज वितरणाची मनमानी
दरम्यान आगीची घटना घडलेल्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे शेत जमिनी आहेत व शेताला लागूनच भोरटेक गावाची दाट लोकवस्ती आहे त्यामुळे महावितरण कंपनीने वेळीच दखल घेतली पाहजे होती येथील शेतकरी बालु पाटील यांनी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रार करून ह्या लोंबळलेल्या तारे काढण्याची मागणी केली होती मात्र ह्या तक्रारीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते जर वेळीच लक्ष दिले असतेतर ही आग लागलीच नसती व लागलेल्या आगीला जर ग्रामस्थांनी वेळीच आटोक्यात आणले नसती तर काय झाले असते? व याला जबाबदार कोण?असे प्रश्न आता शेतकरी विचारीत आहेत

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम