
मधमाशांचा हल्ला, पाच शेतकरी जखमी
मधमाशांचा हल्ला, पाच शेतकरी जखमी
असोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील आसोदा शिवारात शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर मधमाशांच्या मोठ्या थव्याने हल्ला केल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अचानक मधमाशांचा हल्ला
आसोदा शिवारातील शेतकरी व शेतमजूर शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना एका झाडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यात हालचाल झाली आणि अचानक मोठा थवा चिडून बाहेर पडला. संतप्त झालेल्या मधमाशांनी शेतकऱ्यांवर हल्ला करत त्यांना अनेक ठिकाणी दंश केले.
जखमींची नावे
या हल्ल्यात शोभा नारायण झोपे (वय ६५), भागवत ज्ञानदेव खाचणे (वय ५४), सारिका रुपेश भंगाळे (वय २७), रेखा प्रेमचंद अत्तरदे (वय ७०), आणि रुपेश सुधाकर भंगाळे (वय २७) हे जखमी झाले आहेत.
तातडीने रुग्णालयात दाखल
जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम