
म्हसास येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अपात्र
जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने निर्णय
म्हसास येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच अपात्र
जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने निर्णय
प्रतिनिधी पाचोरा
तालुक्यातील म्हसास ग्रामपंचायतीच्या उपसरपंच श्रीमती नबाबाई अर्जुन भिल्ल यांना जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न केल्याने अपात्र घोषित करण्यात आले. यामुळे गावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी जातीचा दाखला एक वर्षाच्या आत सादर करणे बंधनकारक असते. मात्र, उपसरपंच श्रीमती भिल्ल या ठरलेल्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकल्या नाहीत. याबाबत श्रीमती रत्नाबाई संतोष कोळी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १०-१-(अ) अन्वये त्यांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला.
यामुळे ग्रामपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, नवीन उपसरपंच पदासाठी नव्याने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. सदर प्रकरणात ॲड. विश्वासराव भोसले यांनी अर्जदाराच्या वतीने कायदेशीर प्रक्रिया हाताळली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम