रावेर तालुक्यात वादळी पावसाच्या तडाख्याने २५ कोटींचे नुकसान

बातमी शेअर करा...

रावेर प्रतिनिधी

तालुक्यातील पुर्व भागात ता. ११ रोजी वादळी पावसाच्या तडाख्या मुळे ६ गाव शिवारातील १०६ हेक्टरवरील शेतकऱ्यांचे केळी पीक जमिन दोस्त होऊन सुमारे २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आला.

रावेर तालुक्यात महिना भरात तिसऱ्यांदा वाडळी पावसाचा तडखा बसला. गेल्या वर्षभरात जास्त तापमान, त्याच बरोबर अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे, केळी पिकावरील रोग, हवामानातील बदल याचा शेतकरी सामना शेतकऱ्यांच्या केळी मालाला कमीभाव यामुळे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. ता. ११ मे रोजी पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाने रावेर तालुक्यातील केहऱ्हाळे बु, अहिरवाडी, पाडळे बु, पाडळे खु, कर्जद, निरूळ या सहा गावांना दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला.

कृषी विभागाने आज नुकसानीचा अहवाल सादर केला आहे. यात गावनिहाय नुकसान ग्रस्त शेतकरी संख्या कंसात हेक्टर क्षेत्र असे . पाडळे बु. ७२ शेतकरी (२६), पाडळे खुर्द ५८ (३०), निरूळ ३०(१४), कर्जीद २७ (१४), केहऱ्हाळे बु. ६ (४) असे सहा गाव शिवारातील १२१ शेतकऱ्यांच्या केळी पिकाचे सुमारे १०५ हेक्टर वरील केळी पिकाचे झाले आहे. शेतकऱ्यांचे २२१ शेतक्यांचे सुमारे २५ कोटी रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने वरिष्ठ विभागाला पाठवला आहे. आमदार अमोल जावळे यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना महसूल व कृषी विभागाला दिल्या आहेत. तहसीलदार बंडू कापसे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके यांनी नुकसानीची पाहणी केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम