
रावेर येथे भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी
रावेर प्रतिनिधी
विश्वाला शांती आणि अहिंसेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2568 वी जयंती येथिल तक्षशीला बुद्ध विहारात उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम भगवान बुद्धांच्या मूर्तीची पुष्पपूजा, धूपपूजा व दिपपूजा करण्यात आली. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रिय शिक्षक संघरत्न दामोदरे, मा. तालुकाध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी त्रिशरण पंचशील व बुद्धपूजा घेतली. यावेळी प्रा. डॉ. संदीप धापसे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि आज विश्वाला बुद्धांचा शांती आणि अहिंसेचा विचारच तारू शकतो. तसेच संघरत्न दामोदरे यांनी मनोगतातून बुद्धांचा जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकत सांगितले कि बुद्धांच्या जीवनात वैशाख पौर्णिमेला खूप महत्व असुन बुद्धांचा जन्म ई. पु. 563 मध्ये वैशाख पौर्णिमाच्या दिवशी लुबिनी वनात झाला तर बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो दिवस सुद्धा वैशाख पौर्णिमेचा दिवस होता आणि बुद्धांचे महापरीनिर्वाण झाले तो दिवस देखिल वैशाख पौर्णिमेचा होता. म्हणून वैशाख पौर्णिमेच बौद्ध धम्मात खूप महत्व आहे. कार्यक्रमास माजी नगरसेवक जगदीश घेटे, माजी नगरसेवक अँड. योगेश गजरे, माजी उपनगराध्यक्षा संगीता घेटे, माजी उपनगराध्यक्षा रंजना गजरे,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज वाघ, वंचित आघाडीचे मा. तालुकाध्यक्ष बाळू शिरतुरे, त्रंबक वाघ,रमेश तायडे, महेंद्र लोंढे,कुसुंबा ग्रा. पं. सदस्य प्रदीप सपकाळे,विवरे ग्रा. पं. सदस्य महेंद्र गाढे,लखमजी पटेल, अँड. बी. डी. निळे, अँड. तुषार माळी, विनोद तायडे,डी. डी. वाणी,अँड. रमाकांत महाजन,धनराज घेटे, श्रामनेर गाढे,अंकुश गजरे, अनिल घेटे, रमण गजरे,ज्ञानेश्वर अटकाळे, तुषार महाजन, खंडू जगताप, बुद्धरत्न शिरतुरे,वैशाली मुख्यदल, कांचन बनकर, नूतन तायडे, आशा सोनवणे यांचेसह असंख्य उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र अटकाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड. योगेश गजरे यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम