रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केले तब्बल ११ कोटी रुपये!

बातमी शेअर करा...

रेल्वेने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल केले तब्बल ११ कोटी रुपये!

भुसावळ (प्रतिनिधी) : रेल्वे विभागाने मे महिन्यात विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात व्यापक तपासणी मोहीम राबवून विक्रमी ११ कोटी १९ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. ही मोहीम स्थानकांपासून ते धावत्या गाड्यांपर्यंत मोठ्या प्रमाणावर राबवण्यात आली.

तपासणीदरम्यान १ लाख १८ हजारांहून अधिक प्रकरणांवर कारवाई करण्यात आली.
यामध्ये –
🔹 ७०,३२९ प्रवासी बिनतिकीट प्रवास करताना आढळले, त्यांच्याकडून ८.०५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.
🔹 ४८,३६७ अनियमित प्रवाशांकडून ३.१३ कोटी रुपये दंड आकारण्यात आला.
🔹 याशिवाय १०१ माल प्रवाशांकडून अनधिकृत सामान जप्त करण्यात आले.

ही यशस्वी कारवाई डीआरएम इती पांडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार, आणि सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक पी. के. सिंह यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे पार पडली.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, विना तिकीट किंवा आरक्षणाशिवाय प्रवास टाळावा. सर्वांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करावे. अन्यथा कठोर कारवाई होईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम