
वसुली अधिकाऱ्यांकडून ३१ लाखांचा अपहार
वसुली अधिकाऱ्यांकडून ३१ लाखांचा अपहार
रामानंद नगर पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा
जळगाव : प्रतिनिधी
कर्जाची वसुली करूनही ती बँकेत जमा न करता ३१ लाख १२ हजार रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी पाच वसुली अधिकाऱ्यांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘भारत फायनान्स’ या खासगी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून हा प्रकार उघडकीस आला. ८ डिसेंबर २०२२ ते १ ऑक्टोबर २०२३ दरम्यान ३३६ कष्टकरी महिलांकडून वसूल केलेली रक्कम बँकेत जमा न करता आरोपींनी परस्पर वापरल्याचे ऑडिट तपासणीत समोर आले.
याप्रकरणी शेख अबिद शादुल्ला, प्रदीप पवार, अश्विन पाटील, अक्षय बारी व सचिन राठोड या पाच जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम