वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २१ रिक्षाचालकांवर कारवाई

बातमी शेअर करा...

वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या २१ रिक्षाचालकांवर कारवाई
 जळगाव शहर वाहतूक विभागाची मोहीम

जळगाव : शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांमुळे वाहतुकीस वारंवार अडथळा निर्माण होत असून, त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक विभागाने बेशिस्त रिक्षांवर कारवाईची मोहीम राबवली. शनिवार, १० मे रोजी सुभाष चौक परिसरात अतिक्रमण करणाऱ्या व रहदारीला अडथळा ठरणाऱ्या २१ रिक्षांवर कारवाई करण्यात आली.

शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये रिक्षा बिनधास्तपणे उभ्या केल्या जातात. काही चालक चालत्या रिक्षा मध्येच थांबत असल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होतो. अनेक वेळा अपघातही झाले असून नागरिकांनी अशा चालकांच्या अरेरावीविषयी तक्रारी नोंदवल्या आहेत.

वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईत संबंधित रिक्षा चालकांकडील आवश्यक कागदपत्रांची व गणवेश तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्र अपूर्ण असल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.

त्रुटींनुसार कारवाई अनिवार्य
ज्यांच्यावर कारवाई झाली आहे, त्यांच्याकडे प्रलंबित दंड असल्यास त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे. आधीचा दंड थकवलेला असल्यास तोही भरावा लागणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम