विषारी किटकनाशक प्राशन केलेल्या रूग्णाचे वाचले प्राण

बातमी शेअर करा...

विषारी किटकनाशक प्राशन केलेल्या रूग्णाचे वाचले प्राण

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेडीसीन तज्ज्ञांच्या उपचाराला यश
जळगाव – ५२ वर्षीय व्यक्तीने मद्यावस्थेतील स्थितीत विषारी किटकनाशक प्राशन केल्यामुळे त्याच्या जीवनाला धोका निर्माण झाला होता. मात्र डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेडीसीन तज्ज्ञांनी केलेल्या उपचारामुळे त्याचे प्राण वाचले.
याबाबत माहिती अशी की, युवराज पाटील (वय ५२, रा. जोगलखेडा) यांनी मद्यावस्थेत विषारी किटकनाशक प्राशन केले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करून अत्यावस्थेतील उपचार सुरू करण्यात आले. मेडिकल तज्ञांकडून शंभर टक्के विश्वासाने उपचारांची सुरुवात करण्यात आली आणि विष बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
श्वास नियंत्रणासाठी उपचार
रुग्णाच्या जीवाच्या बचावासाठी, अत्यावस्थेतील उपचारानंतर त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. डॉक्टर आणि अन्य वैद्यकीय तज्ञांच्या कटीबद्ध कामामुळे एक आठवडा किमान लागला, पण त्याची शारीरिक स्थिती हळूहळू सुधारू लागली. आठवडाभरात, त्याच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीत लक्षवेधी सुधारणा झाल्याचे दिसून आले, मेडीसीन तज्ञांच्या उपचारामुळे आणि रूग्णाच्या इच्छाशक्तीमुळे त्याचे प्राण वाचले.
या उपचासाठी मेडीसीन तज्ज्ञ डॉ. चंद्रय्या कांते, डॉ. पूजा तन्नीरवार, डॉ. अचल दुर्गे, डॉ. रिषभ पाटील यांनी प्रयत्न केले.
विषारी पदार्थ किंवा द्रव्य सेवन केलेल्या व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल करून योग्य आणि त्वरित उपचार घेतल्यास अत्यवस्थ स्थितीत असलेल्या रूग्णाचे प्राण वाचवले जाऊ शकतात. डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपलब्ध असलेली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम यामुळे अशा रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांना निश्चीतच यश मिळत आले आहे.

<span;><span;>- डॉ. परितोष

मल्लूरवार

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम