शहरात साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आजपासून स्वच्छता मोहीम

बातमी शेअर करा...

शहरात साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आजपासून स्वच्छता मोहीम

जळगाव : शहरातील विविध साथीच्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी दि.१ जून ते ११ जूनपर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सुचना देण्यात आल्या आहेत. अकरा दिवसात शहरातील साथीचे आजार आणि रोगराईचा प्रादुर्भाव रोखणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.

पावसाळ्यात पाणी साचल्याने दास, माझ्या आणि इतर रोगजंतूंचा फैलाव होऊन डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो बांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाहतो. हे लक्षात घेऊन, महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून

ही विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम वॉर्डनिहाय राबवली जाणार आहे. यासाठी सहायक आयुक्त उदय पाटील यांनी दोन विशेष पथकांची नियुक्ती केली असून, प्रत्येक पथकाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. दि.१ व २ रोजी समता नगर आणि कांचन नगर, दि.३ पिंप्राव्य गावठाण आणि गेंदालाल मील परिसर, दि.४ निमखेडी गावठाण आणि जोशी पेठ, दि.५ गोपाळपुरा आणि मास्टर कॉलनी, दि. ६ तांबापुरा दि.७ रोजी सम्राट कॉलनी, दि.८ जैनाबाद, दि.९ रोजी राजीव गांधी नगर आणि पोलीस कॉलनी, १० रोजी खंडेराव नगर आणि दिक्षीत वाडी, ११ रोजी आशाबाबा

नगर भागात ही मोहिम राबविण्यात येत आहे.

नागरिकांना आयुक्तांकडून आवाहन आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत, विशेषतः झोपडपट्टी भागातील अस्वच्छता, साचलेले पाणी आणि कचरा यामुळे साथीचे आजार लवकर पसरतात. त्यामुळे या भागांवर अधिक लक्ष केंद्रित करून प्रभावीपणे स्वच्छता राबवण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नागरिकांनीही या मोहिमेला सहकार्य करावे आणि आपल्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम