
शेतकरी कृती समितीचा बच्चू कडू यांना पाठिंबा ; आंदोलन थांबवावे यासाठी तहसीलदारांना निवेदन
शेतकरी कृती समितीचा बच्चू कडू यांना पाठिंबा ; आंदोलन थांबवावे यासाठी तहसीलदारांना निवेदन
चोपडा : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी शेतकरी कृती समितीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
तसेच शेतकरी कृती समितीने बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून कृती समितीचे काही कार्यकर्ते लवकरच गुरुकुंज मोझरी येथे जाणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, निवेदनात शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीनसह साऱ्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना आंदोलने करायचे, त्या वेळच्या शेतमालाच्या बाजारभावात
आज ही फरक पडलेला नाही. तेच भाव १० वर्षानंतर आहेत. तेव्हाही तो परवडत नव्हता, आज तर तीन पट रासायनिक खतांचे व मजुरीचे दर वाढलेत, त्या सोबत जीवन जगण्याचा खर्च ही प्रचंड वाढला. त्यामुळे शेतकरी मेटाकुटिस आला आहे. शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यातून बाहेर काढावे आणि बच्चू कडू यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात व त्यांचे आंदोलन थांबवावे, अशी मागणी कृती समितीने तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या वेळी एस. बी. पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप पाटील, चंद्रकांत पाटील, कुलदीप पाटील, कुलदीप राजपूत, अजित पाटील हजर होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम