![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2025/01/शेतकऱ्यांच्या-सक्षमीकरणासाठी-सरकार-कटिबद्ध-3-scaled.jpeg)
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील
मुसळी येथे शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील
मुसळी येथे शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप
जळगाव पतिनिधी ‘
अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे.कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मुसळी बु, तालुका धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलतं होते.
यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नितीन पाटील, मोहन मराठे, कमलाबाई पाटील, भगवान पाटील, सीताराम पाटील, हिरामण पाटील, प्रेमराज गुंजाळ, देविदास मराठे आणि वसंत पाटील या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी कार्यक्रमास प्रांताधिकरी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार, महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी अजितसिंग पवार, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले , कृषी अधिकारी देसले व कोळी, नायब तहसीलदार सातपुते साहेब व मोरे साहेब तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सौं. सुरेखा सुरेश गुंजाळ, उपसरपंच वसंत दादा भिल, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील व मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. के. पाटील यांनी मानले.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम