
शैक्षणिक दाखले पास होण्यास विलंब
विद्यार्थ्यांचे नुकसानास जबाबदार कोण ? फिफो प्रणाली सुरू करण्याची अपेक्षा
शैक्षणिक दाखले पास होण्यास विलंब
विद्यार्थ्यांचे नुकसानास जबाबदार कोण ? फिफो प्रणाली सुरू करण्याची अपेक्षा
सावदा (प्रतिनिधी)
फैजपूर येथील उपविभागीय (प्रांतअधिकारी) कार्यालय तसेच रावेर तहसीलदार कार्यालय अंतर्गत विविध कामे सुरू असतात या ठिकाणी कामाचा निपटारा व्हावा म्हणून कर्मचारी वर्ग देखील तैनात आहे. मात्र या कार्यालयातून अनेक कामे ही अति विलंबाने होत असल्याने अनेकवेळा नागरिकांना याचा मोठा फटका बसतो.
यातच आता या अनेक सरकारी भरती निघाल्या असून त्यांची अर्ज भरण्याची अखेर ची तारीख जवळ असल्याने सदर विद्यार्थी यांचे अर्ज भरणे अवघड होऊन बसले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या नोकर भरती देखील आगामी काळात होणार असून यासाठी व पुढील वर्षीच्या शैक्षणिक कामा साठी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात नॉनक्रिमिलेयर, कास्ट, सेंट्रल कास्ट अशी विविध दाखले मंजुरीसाठी प्रांत कार्यालयात पाठविली असून मात्र अनेक वेळा 20 दिवसा पेक्षा जास्त दिवस झाल्यावर देखील ही प्रकरणेपास होत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा अर्ज भरून गेल्याची मुदत निघून गेल्यावर देखील दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून यास जबाबदार कोण ? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे
अनेक वेळा नॉनक्रिमिलेयर वा इतर दाखल्यावर कास्ट व इतर कागदपत्रे जोडल्यावर तसेच तो दाखला 20 ते 25 दिवसानंतर तपासल्यावर सदर दाखला साठी आवश्यक नसलेली देखील कागदपत्रे जोडा अशी क्युरी मारून प्रकरण परत पाठविण्यात येत असल्याने अनेकांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. तरी सदर बाबतीत फैजपूर येथील कर्तव्यदक्ष प्रांतअधिकारी यांनी जातीने लक्ष पुरवून सदर दाखले तात्काळ निकाली काढावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त होत आहे. शासनाने कमीत कमी कागदपत्रे जोडण्याची जी मोहीम हाती घेतली आहे, ती लक्षात घेता नको असलेली अनावश्यक कागदपत्रे जोडण्यासाठी प्रकरण परत पाठविणे देखील थांबविणे आवश्यक असून या प्रकरणी स्वतः प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी जळगांव तसेच लोकप्रतिनिधी यांनी समन्वय साधून मार्ग काढावा अशी देखील अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान दाखले व ईतर कामे गतिमान पद्धतीने व्हावे यासाठी मागील काळात फिफो प्रणाली आणण्यात आली होती. मात्र सध्या ती बस्तानात गुंडाळून ठेवण्यात आली असून ती देखील सुरू करावी जेणे करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन दाखले लवकर पास होतील अशी अपेक्षा विद्यार्थी व नागरिक व्यक्त करीत आहे.
दरम्यान रावेर व फैजपूर येथील कार्यालयात विद्यार्थी वा नागरिक दाखले पास करून घेणे कामी गेल्यास त्यांना ध्वज निधी पावती फाडल्या शिवाय त्यांचे दाखले पास केले जात नसल्याने यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक ध्वज निधी देणगी हा ऐच्छिक भाग असतांना त्यासाठी अडवणूक केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. याप्रकारा बाबत विद्यार्थी व नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम