“सत्यशोधक समाजाची वर्तमान फलश्रुती’ या विषयावर व्याख्यान

बातमी शेअर करा...

“सत्यशोधक समाजाची वर्तमान फलश्रुती’ या विषयावर व्याख्यान

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा फुले अध्ययन केंद्रातर्फे सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्ताने “सत्यशोधक समाजाची वर्तमान फलश्रुती’ या विषयावर दि. २४ सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते विचारवंत जयसिंग वाघ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्र तसेच विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु. पगारे उपस्थित होते.

यावेळी जयसिंग वाघ म्हणाले की, महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाची वैचारिक पार्श्वभूमी तसेच सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर केलेल्या लोकोद्धारक चळवळीचे वर्तमान काळात पडलेले पडसाद याविषयी माहिती देताना आजचे बहुजन समाजाचे नेते घडविण्यामध्ये सत्यशोधक समाजाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. थोडक्यात, आजच्या काळातील ज्या आरक्षण विषयक राजकीय चळवळी सुरू आहेत त्यादेखील आजच्या काळातील सत्यशोधक समाजाची फुलश्रुती असल्याचे स्पष्ट होते अशी माहिती त्यांनी दिली.

अध्यक्षीय मनोगतातून प्रा. पगारे म्हणाले की, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून वर्णव्यवस्थेवर प्रहार करत बहुजन समाजाला दिशा देण्याचे कार्य केलेले होते. याचीच फलश्रुती म्हणून राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्यांचे हक्क सुरक्षित केलेत. एकूणच भारतातील प्रत्येक माणसाच्या हक्क अधिकारांविषयो सत्यान्वेषी भूमिकेतून तसेच विवेकशील विचारातून निर्माण झालेले संविधान हे सत्यशोधक चळवळीची फलश्रुती असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा फुले अध्ययन केंद्राच्या विभागप्रमुख डॉ. पवित्रा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपक खरात तर आभार जितेंद्र नाईक यांनी मानले. या कार्यक्रम प्रसंगी विचारधारा प्रशाळेतील तसेच भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम