
सावदा भूमिअभिलेख कार्यलयाकडून नागरिकांची कामे प्रलंबित : उंबरठा घासूनही कामे करण्यास कुचराई
सावदा भूमिअभिलेख कार्यलयाकडून नागरिकांची कामे प्रलंबित : उंबरठा घासूनही कामे करण्यास कुचराई
सावदा (प्रतिनिधी) – सावदा भुमिअभिलेख कार्यालयाकडून नागरिकांची महत्त्वाची कामे होत नसल्याने नागरिकांना कार्यालयाच्या नाहक चकरा मारावे लागत आहेत. अनेक कामे येथील अधिकाऱ्याने प्रलंबित ठेवल्याने का प्रलंबित ठेवली आहेत त्यामागील कारण देखील स्पष्ट करण्यात येत नसल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सावदा शहर सावदा भूमी अभिलेख कार्यालय अंतर्गत येत असून या कार्यालयात शेत प्लॉट तसेच घरांचे वारस नोंद कमी जास्त करण्यासाठी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते परंतु कार्यालय प्रमुख कधी हजर असतात तर कधी काही हजर असतात त्यांच्या येण्या जाण्याचा नागरिकांना वेळही माहीत नसतो त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या महत्त्वाची कामे अडकून पडली असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
गेल्या महिन्यापूर्वी रावेर येथे आमदार चंद्रकांत पाटील यांचे उपस्थितीत सर्व विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी देखील तांदलवाडी येथील नागरिकांनी सावदा भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख यांच्याशी मोठा आर्थिक व्यवहार करून देखील वेळेवर काम करत नसल्याची तक्रार करण्यात आली होती. परंतु तरीदेखील या अधिकाऱ्याला कोणतेही सोयरा सुतक दिसत नाही. किंवा या कार्यालय प्रमुखावर कुण्या उच्च अधिकार्याचा हा तर नाही ना या निमित्ताने शंका उपस्थित होते.
तर या कार्यालयात या अनेकदा काम करण्यासाठी अर्ज केल्यावर ज्या कामासाठी अर्ज केला आहे ते न होता जास्तीचे किंवा दुसरेच नोंद वा काम होते त्यामुळे अनेकदा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो, ही कामे येथील अधिकारी कशासाठी करतात ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे व मग जास्तीची झालेली नोंद वा कमी झालेली नोंद दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना पून्हा या कार्यलयाच्या महिनो न महिने चकरा माराव्या लागतात व अश्या वेळी येथे अनेकदा आर्थिक देवाण – गेव्हाण केल्या शिवाय ही कामे होत नाही त्या मुळे यासाठीच अश्या चुकीच्या नोंदी येथील अधिकारी व कर्मचारी टाकतात का असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकात उपस्थित होत आहे
दरम्यान असाच एक प्रकार येथील माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय महाजन यांचे एका अर्जा बाबत घडला असून त्यांनी एका दस्तावर अज्ञान पालक करता ही दोन भावांच्या नावावरून नोंद होती त्यातील एक भाऊ सज्ञान झाला त्यामुळे अज्ञान पालन करता ही नोंद कमी करण्यासाठी अर्ज केला होता परंतु सावदा येथील भूमी अभिलेख कार्यालयाचे प्रमुख यांनी दोघे भावांना सज्ञान दाखवले मी पुन्हा त्यांच्याकडे अर्ज करून यातील एकच बालक सज्ञान आहे व त्याच्याच नावावर नोंद करण्यात यावी असा विनंती अर्ज दिला परंतु पाच महिन्यापासून फक्त भूमी अभिलेख कार्यालयाच्या चकरा मारत आहे परंतु अद्याप माझे कोणतेही काम होत नाही अशी माहिती दत्तात्रय महाजन माजी उपनगराध्यक्ष सावदा यांनी सांगितली
दरम्यान आता अश्या कामचुकार व नागरिकांना मुद्दाम त्रास होईल अश्या स्वरूपाच्या चुकीच्या नोंदी करणाऱ्या अधिकाऱ्यां विरुद्ध केवळ दंडात्मक कार्यवाही न करता सखोल चौकशी होऊन नागरिकांचे मुद्दाम नुकसान केल्याने निलंबन व्हावे अथवा याहून कठोर कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा नागरिकातून व्यक्त होत आहे व कार्यवाही झाल्यास यातून जनाअक्रोश निर्माण होऊन नागरिक संवैधानिक मार्गाने आंदोलनाचा पवित्रा सुद्धा घेण्याची शक्यता निर्माण होत आहे तरी अश्या मग्रूर अधिकारी यांचे विरुद्ध केवळ बदली न करता नागरिकांच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार धरून कार्यवाही करावी अशी देखील अपेक्षा व्यक्त होत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम