सिंदेवाहीत तेंदूपत्ता तोडणाऱ्या तिघा महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

बातमी शेअर करा...

सिंदेवाहीत तेंदूपत्ता तोडणाऱ्या तिघा महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

चंद्रपूर जिल्ह्यातील पहिलीच धक्कादायक घटना

सिंदेवाही (जि. चंद्रपूर) : तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या तीन महिलांवर वाघाने हल्ला करत त्यांचा मृत्यू केल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (१० मे) दुपारी उघडकीस आली. सिंदेवाही शहरालगत असलेल्या मेंढा (माल) येथील कांता बुधाजी चौधरी (वय ६५), शुभांगी मनोज चौधरी (२८) आणि रेखा शालिक शेंडे (५०) अशी मृत महिलांची नावे आहेत.

सकाळी ९.१५ च्या सुमारास डोंगरगाव नियतक्षेत्रात तेंदूपत्ता संकलन करत असताना वाघाने वंदना विनायक गजभिये या महिलेला देखील जखमी केले होते. त्यानंतर दुपारी सुमारे १२.३० वाजता तिन्ही महिलांवर एकाच वेळी हल्ला करत त्यांचा बळी घेतल्याची घटना समोर आली आहे.

सकाळी तेंदूपत्ता संकलन करून काही महिला गावात परत आल्या, मात्र कांता, शुभांगी व रेखा या परत न आल्याने गावकऱ्यांनी डफली वाजवत जंगलात शोधाशोध सुरू केली. यावेळी एक अत्यंत भयावह दृश्य त्यांच्या समोर आले – वाघीण एका महिलेच्या मृतदेहावर बसून मांसभक्षण करत होती. गावकऱ्यांनी डफली वाजवून आरडाओरड केल्यानंतर वाघीण तेथून पळाली.

ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यजीव हल्ल्यांमध्ये गंभीर मानली जात असून, एकाच वेळी तिघा व्यक्तींना वाघाने ठार मारल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. वन विभाग व पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम