
स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणवर राष्ट्रीय चर्चासत्र
स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणवर राष्ट्रीय चर्चासत्र
*कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन*
जळगाव (प्रतिनिधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेअंतर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्र आणि व्यवस्थापनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दि. १८ व १९ मार्च रोजी ‘स्वामी विवेकानंदांच्या तेजस्वी विचारांची प्रासंगिकता आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रासाठी भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद भारत सरकार यांनी सहकार्य केले आहे. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता उद्घाटन सत्र होणार असून ज्येष्ठ विचारवंत प्रा.प्रकाश पाठक यांचे बीजभाषण होईल. विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे यांची यावेळी उपस्थिती असेल. उद्घाटना नंतरच्या चर्चासत्रात डॉ. एन.के. ठाकरे, डॉ.प्रियंका वैद्य (सिमला), डॉ.पराग जहागीरदार (जळगाव), डॉ. अपर्णा लळीकर (पुणे) यांचे व्याख्यान होणार आहे.दि. १९ मार्च रोजी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांचे निबंध सादरीकरण होईल. त्यानंतर डॉ.निखिल यादव (नवी दिल्ली) यांचे व्याख्यान हाईल. दुपारी डॉ.विश्वास देवकर (पुणे), यांच्या उपस्थितीत व प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली समारोप होणार आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. निमंत्रक म्हणून प्रा.अतुल बारेकर तसेच संचालक प्रा.म.सु.पगारे व प्रा.मधुलिका सोनवणे हे काम पहात आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम